मुख्य सामग्रीवर वगळा

रायवळ (गावठी) आंबा; हापूस आंब्याचा राजा असेल तर, रायवळ (गावठी) आंबा सर्वसामाण्यांसाठी डॉन पेक्षा कमी नाही.




                उन्हाळा आला की शाळेच्या सुट्टी बरोबरच वेध लागतात ते  आंब्यांचे. आंब्याच्या १००० पेक्षा जास्त जाती आहेत असे मानले जाते. त्यापकी सगळ्यांना परिचयाच्या जाती म्हणजे हापूस, पायरी, तोतापुरी अशा आहेत.

                उन्हाळा चालू झाला की बातमी येते की पहिली हापूसची पेटी बाजारात दाखल, पण भव ऐकून सामान्यांचे मात्र ती खरेदी करण्याचे धाडस होत नाही. हापूस जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची चांगलीच हवा मार्केट मध्ये असते. आंब्याचा राजा असं देखील त्याला म्हटल जातं. पण हा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ही असतो अशातच एप्रिल मध्ये बाजारात येतो तो रायवळ जातीचा आंबा. काही गोड आंबट चव असणारा हा आंबा मात्र सर्वांना परवडणारा असतो.

                 याच रायवळला आपण सगळे गावठी आंबा म्हणून ओळखतो. हापूसची जाहिरात पहिल्या पानावर येते तर याला मात्र कुठे तरी कोपऱ्यात जागा मिळते. हा आंबा कोकणासोबत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याच ठिकाणी आढळतो. 



                 गावाकडे असणारी मुलं कधी शनिवारच्या दुपारच्या शाळेतून घरी येताना कुणाच्या तरी बांधावरील या आंब्याच्या झाडावरील कैऱ्या पडून घरातून आणलेलं मिठ तिखट लाऊन दात आंबतील तोपर्यंत खात, तर कधी शेतात दुपारच्या जेवणाबरोबर हाच आंबा सोबत करी. याचे झाड इतर झाडांच्या तुलनेत मोठ तर असतच पण त्याच बरोबर ते मातीही घट्ट पकडुन ठेवत. प्रतिकूल परिसथितीतही हे झाड तग धरून राहतं अन शेतकऱ्याला अंब्यासोबत थंड सावलीही देत. पूर्वी गावाकडे बऱ्याच जणांच्या बांधावर हे झाड हमखास दिसायचं. अन् एकदा पाड लागला की याचे आंबे शेतकरी स्वतः गावात आजूबाजूच्या लोकांना मोकळ्या हतेने वाटून राहायला विक्री करे.

                 पण आपण ज्या झाडावर सुर पारंब्या खेळलो, ज्या झाडाचे आंबे कधी दगड मारून पाडले, ज्या झाडा खाली उन्हाळ्याची सुट्टी घालवली त्याच झाडांची संख्या कमी होऊन ही गावठी (रायवळ) आंब्याची जातं संपुष्टात येत चाललीय. तरी आपण आपली गावठी रायवळ आंब्याची जात वाचूया. अन् पर्यावरणाला साथ देऊया.

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

The Legend of Munjya Ghost...

The Legend of Munjya Ghost In the heart of Varanasi, there's a eerie tale that has been passed down for generations. The story of Munjya Ghost has sent chills down the spines of many. It's a legend that has become an integral part of the city's folklore. *The Story* Munjya was a young girl who lived in Varanasi during the 19th century. She was known for her beauty and kindness. Tragically, she was married off to a much older man who was a wealthy businessman. The marriage was unhappy, and Munjya's husband treated her cruelly. One day, Munjya's husband discovered that she was having an affair with a young man. In a fit of rage, he murdered her and buried her body in the house. *The Haunting* People claim to have seen Munjya's ghost wandering the streets of Varanasi, searching for her lost love. Some say she appears as a young woman in a white saree, with a haunting smile on her face. Others claim to have heard her whispering "Mere piya" (My love). *The ...

नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाने पहिल्या सात दिवसात जमवला इतका गल्ला...

                               नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी परवणीच असते. तसेच मागील आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट घर बंदूक बिर्याणी हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे या चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे स्वतः देखील आपल्याला काम करताना दिसतील, त्याचबरोबर मराठी इंडस्ट्रीतील मेगास्टार सयाजी शिंदे हे देखील या चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर सैराट मधील परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि सैराट मधील इतर कलाकार ही आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. अशी भाली मोठी स्टार कास्ट असताना हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहात नक्की खेचून आणू शकेल असे वाटत होते.                त्याचबरोबर या चित्रपटासाठी जवळपास ८ कोटी खर्च आल्याचे अनेक मीडिया आउटलेट सांगत होते. पण व्हायचं तेच झालं वेगळ्या स्टोरी लाईन वर आधारित असलेला चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पडू शकला नाही. हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.       ...